सूर्य मावळेल, पण समृद्ध गावाचं स्वप्न नाही !
चंद्रप्रकाश पुरेसा असतो, जेव्हा ध्येय असतं उजेडाचं…
अंधार दाटत असला तरी, ग्रामविकासाची मशाल तेजाने प्रज्वलित राहते.
रात्री ८.३० वाजता सावर्डे ग्रामपंचायतीत झालेली ग्रामसभा म्हणजे लोकसहभाग, निर्धार आणि प्रशासनाची खरी ओळख.
सकाळी ७ वाजता सुरू झालेला प्रवास, ८ ते ९ ग्रामपंचायतींचा दौरा,
आणि तरीही संध्याकाळीही तीच ऊर्जा, तीच बांधिलकी —
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) आणि त्यांच्या टीमकडून!
गावकऱ्यांचा उत्साह, एकतेचा भाव आणि समृद्ध गावाचं स्वप्न यामुळे
ग्रामसभा झाली परिवर्तनाची प्रेरणा.
रात्रभर ग्रामपंचायत भवनात मुक्काम करून प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वासाची नाळ अधिक मजबूत झाली.
जेव्हा काम हे सेवा बनतं, तेव्हा अंधारही पहाट बनतो.